धान्यही करतात आपले जीवन समृद्ध…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, ज्या प्रमाणे हिंदू धर्मशास्त्रात झाडांना किंवा फळांना,फुलांना महत्व दिलं गेलं आहे, अगदी त्याचप्रमाणे हिंदू धर्म शास्त्रात धान्यांना विशेष महत्व आहे. धान्य पूजेच्या साहित्याचाही एक भाग आहेत.

हिंदू धर्मशास्त्र किती वर्ष जुनं आहे हे कोणीच सांगू शकत नाही. मात्र हिंदू धर्म शास्त्रात प्रत्येक गोष्टीचं महत्व सांगितलं गेलं आहे. ज्या प्रमाणे हिंदू धर्मशास्त्रात झाडांना किंवा फळांना,फुलांना महत्व दिलं गेलं आहे,

अगदी त्याचप्रमाणे हिंदू धर्म शास्त्रात धान्यांना विशेष महत्व आहे. धान्य पूजेच्या साहित्याचाही एक भाग आहेत. काही धान्य अशीही आहेत ज्यांचा वापर योग्य दिवशी योग्य प्रकारे केल्यास देवाचा कृपाशिर्वाद तुमच्यावर राहातो.

तांदूळ : अक्षता म्हणजे तांदळाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. देवतांच्या पूजेच्या वेळी अक्षता अर्पण केल्या जातात. पण लक्षात ठेवा की पूजेत नेहमी अख्खा तांदूळ वापरावा.

तुटलेला तांदूळ वापरणे पूजेसाठी निषिद्ध मानले जाते. संपूर्ण तांदूळ ७ वेळा धुवा आणि प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला अर्पण करा. असे केल्याने तुमच्यावर भोलेनाथाची कृपा राहते. मालमत्तेच्या वादातही तुम्हाला यश मिळेल.

गहू : धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णूला अक्षता अर्पण करणे वर्ज्य असून त्यांना गहू अर्पण करणे शुभ मानले जाते.

असे म्हणतात की भगवान विष्णूला गहू अर्पण केल्याने तुमची संततीची इच्छा पूर्ण होते आणि लवकरच तुमच्या घरात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. गव्हाचा हा उपाय तुमच्या आयुष्यात आनंद आणू शकतो.

संपूर्ण मूग : अख्खा मूग केवळ आरोग्यदायी आहार म्हणून वापरला जात नाही, तर पूर्ण मूग मनोकामना पूर्ण करण्यासाठी खूप फायदेशीर मानले गेले आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार दर शुक्रवारी माता दुर्गेला संपूर्ण मूग अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. असे केल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी येते.

ज्वारी : ज्योतिषशास्त्रानुसार श्रीगणेशाला ज्वारी खूप प्रिय आहे. गणेशाला हळदीसह ज्वारी अर्पण केल्याने तुमच्या घरातील अविवाहितांचे लवकर लग्न होण्यास मदत होते. तुमची सर्व संकटं दूर होतात.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *