नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, घरातील स्त्री ही नेहमीच तिची कर्तव्य पूर्ण करत असते, घरातील सर्व कामे करत असते. तिच्या पतीच्या दीर्घायु साठी सुदधा धार्मिक कार्य करते. पतीला यश,
कीर्ती मिळावी म्हणून ती नेहमी तत्पर असते. पतीला प्रत्येक कार्यात साथ देण्यास ती समर्थ असते. विवाहानंतर सासरच तिचं घर मानते. सासरी गेल्यावर तेथील सर्वांना आपलं मानते
व यासाठी ती प्रत्येक जोखीम, संकट पेलत असते. याचबरोबर अशीही काही कामे आहेत, जी विवाहित स्त्रियांनी केल्यास त्यांच्या पतीला धन प्राप्तीचे जास्तीत जास्त स्रोत मिळतात.
स्त्री ही पुरुषाची ताकद असते, ती लग्न करून घरात येताना सोबत भाग्य घेऊन येते व काही पुरुषांच्या बाबतीत हे खरं सुद्धा होते.
तसेच घरातील ज्या गोष्टी स्त्रिया करतात त्याचा परिणाम तिच्या कुटुंबातील सदस्यांवर होत असतो. तसेच घरातील आनंद, दुःख, संकटे सर्व परिस्थिती मध्ये धीराने सामोरी जाणारी स्त्री खरंच भाग्यवान पुरुषालाच मिळते.
ज्या स्त्रिया घरात नेहमी स्वच्छता ठेवतात, घर सुंदर, नीटनेटके ठेवतात अशा स्त्रियांच्या घरी लक्ष्मी पाणी भरते, कारण जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी वसते.
अशा स्त्रियांवर माता लक्ष्मीचा वरदहस्त राहतो, त्यामुळे या स्त्रियांच्या पतीबद्दलच्या इच्छा निश्चितच पूर्ण होतात. या स्त्रियांच्या पतीला नेहमी यश, संपत्ती मिळते.
ज्या स्त्रिया या घरातील लोकांशी नेहमी चांगल्या वागतात, प्रेमाने वागतात अशा स्त्रियांच्या घरी वाद, भांडण होत नाहीत व नेहमी सुख, शांती, समाधान राहते.
अशा स्त्रिया त्यांच्या सासरचे भाग्य उजळून टाकतात. ज्या स्त्रिया धार्मिक असतात, देवावरती विश्वास ठेवून पूर्ण श्रद्धेने ज्या पूजापाठ करतात अशा स्त्रियांना त्यांच्या पतीच्या कामात नेहमी यश आलेले दिसते, अडचणींवर मात करण्याचं बळ यांच्याकडे असते.
ज्या स्त्रिया रोज पतीचे पाय दाबून देतात जसे की माता लक्ष्मी भगवान विष्णूचे पाय दाबत असते, अशा स्रीयांच्या पतीला भरपूर धनलाभ होतो.
यानंतर ज्या स्त्रिया अतिशय चांगल्या स्वभावाच्या असतात, नेहमी हसमुख, मधुर वाणी असणाऱ्या स्त्रियांच्या पतीची हीच खरी ताकद असते.
त्यामुळे त्यांचे पती नेहमी त्यांच्यावर खुश असतात व प्रगती करत राहतात. ज्या स्त्रिया जास्त अपेक्षा ठेवत नाहीत, समाधान असतात अशा स्त्रियांच्या पतीचे आयुष्य समाधानी असते व त्यांचा संसार अतिशय सुखकारक होतो.
त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हे गुण अवलंबले पाहिजेत जेणेकरून तुम्ही नक्कीच तुमच्या पतीची, घरची, तुमची प्रगती, यश, कीर्ती, सन्मान मिळवू शकता.
पती-पत्नीने रोज केळीच्या झाडाला जल अर्पण करावे किंवा केळीचे मूळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून उजव्या हातावर बांधावे.
वैवाहिक जीवन सुखी करण्याचा हा प्रभावी उपाय आहे. काहीवेळा घरातील निगेटिव्हिटीमुळे पती-पत्नीमध्ये वाद होतात.
या नकारात्मक प्रभावापासून दूर राहण्यासाठी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे.दुर्दैवाचे रुपांतर सौभाग्यात करण्यासाठी सकाळी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ करावी.
हा उपाय तुमच्या कुंडलीत उपस्थित गुरु ग्रह मजबूत करतो. याशिवाय भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आणि लवकरच तुमचे भाग्यही उंचावते. संध्याकाळी आंघोळ करताना पाण्यात चिमूटभर मीठ मिसळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
मान्यतेनुसार, हनुमान जी, ज्यांना कलियुगाचे देवता म्हटले जाते, ते आपल्या भक्तांचे प्रत्येक संकटापासून रक्षण करतात, त्यामुळे पंचमुखी हनुमानाची पूजा नियमितपणे करावी.
मंगळवारी पंचमुखी हनुमानासमोर दिवा लावल्याने घरात धनसंपत्ती वाढते. संकटांपासून मुक्तता आणि शत्रूंवर विजय प्राप्त होतो.जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा स्थिरावली असेल तर तुम्ही नियमितपणे संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा.
दररोज सकाळ संध्याकाळ घरात कापूर लावल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते आणि सकारात्मकता कायम राहते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.