नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपलं घर गोकुळ असावं, सदा शांतता सुख समाधान नांदावी असे सर्वांना वाटते. त्यासाठी काही साधे सोपे उपाय जे आपले स्वामी सांगतात ते करा फरक नक्की जाणवेल.
घरात शांतता नांदावी आणि सुख समृद्धी यावी हे सगळ्यांनाच वाटत. यासाठी स्वामींनी सांगितलेले काही सोपे तोडगे जे आपण पाहणार आहे हे सोपे तोडगे तुमच्या घरात नक्की करा तुमच्या घरात शांतता नांदेल सुख समृद्धी येईल हे तोडगे अतिशय सोपे आहेत हे सोपे तोडगे कोणीही करू शकतात.
त्यासाठी काही विशेष सेवा, खूप खर्च असेही नाही.फक्त निर्मळ मन, ईश्वराच्या ठायी श्रद्धा हवी.
रोज घरामध्ये देवांची आरती झालीच पाहिजे मग ते सकाळी करा किंवा रात्री करा आरती करताना घंटी नक्की वाजवावी याने नकारत्मकता नष्ट होते. संध्याकाळी कोणी घरात झोपु नये याने घरात गरिबी आणि दारिद्रय येते आणि लक्ष्मी माता नाराज होते.
निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना,प्रचंड स्वामीबळ पाठी शी नित्य आहे रे मना आतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्यही शक्य करतील स्वामी.
जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञाविणा , काळही ना नेई त्याला परलोकी ही ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी.
असा हा संपूर्ण तारक मंत्र रोज सायंकाळी पठण केल्यास सर्व अडचणी दूर होतात, स्वामी सदैव पाठीशी राहतात.
घरात कुलदेवतेची पूजा नक्की करावी मग तो कुलदेवतेचा कळस असेल किंवा कुलदेवतेची मूर्ती असेल त्यांचे पूजन करून त्यांच मंत्र जप आवश्य करावा.
पितरांसाठी रोज एक चपाती कुत्र्याला किंवा कावळ्याला नक्की टाकावी याने पितृ दोष कधीही आपल्यावर होत नाही.
मुख्यवारी मांसाहारी पदार्थ खाऊ नये मुख्यवार म्हणजे सोमवार, गुरुवार, शनिवार, एकादशी, चतुर्थी हे असे वार आहेत यादिवशी मांसाहार पदार्थ चुकूनही खाऊ नये.
स्वयंपाक करताना महिलांनी देवाचे नामस्मरण करावे श्री स्वामी समर्थ या नावाचा जप महिलांनी स्वयंपाक करताना करावा तर याचा खूप फायदा महिलांना आणि संपूर्ण कुटुंबाला होत असतो.
रोज घरात सकाळी किंवा संध्याकाळी कापूर नक्की जाळावा तुम्ही जेव्हा तुमच्या देवघरात आरती करत असाल त्या वेळी कापूर लावून देवाला ओवाळायच आहे.
धनलाभ हा आपल्या राशिवरती अवलंबून असतो म्हणून तर प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीत बदल असतो. ते सुद्धा तुम्ही करू शकता.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.