तुळस सारखी सुकत असेल तर समजून जा की हे आहेत दैवी संकेत…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, भारतीय संस्कृतीत तुळशीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. दैवी गुणधर्मांसोबतच ही वनस्पती औषधी गुणांनीही परिपूर्ण आहे. त्यात अनेक अलौकिक आयुर्वेदिक शक्ती आहेत. सनातन धर्म मानणारे अनेक लोक आपल्या घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावतात, पण तुळशीचे काही नियम अनेकांना माहीत नाहीत.

वास्तुशास्त्रानुसार तुळस या पवित्र वनस्पतीभोवती काही वस्तू ठेवू नयेत. तुमच्या घरी तुळशी भोवती या गोष्टी असतील तर तुम्ही त्या ताबडतोब काढून घ्यायला हव्या. असे न केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होऊ शकते आणि कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

शास्त्रानुसार रविवार, एकादशी आणि ग्रहणाच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये आणि तुळशीची पानेही तोडू नयेत. पण तुम्हाला हवे असल्यास रविवारी पाण्याऐवजी दूध अर्पण करून तुपाचा दिवा लावू शकता. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.

लक्ष्मीचा वास असतो तुळशीमध्ये. धार्मिक मान्यतेनुसार तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते. घरात सुख-समृद्धी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभण्यासाठी घरांमध्ये तुळशीचे रोप लावून तिची नियमित पूजा केली जाते.

ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते त्या घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि त्या घरात कधीही नकारात्मकता प्रवेश करत नाही.

संकटाचा इशारा समजून घ्या. शास्त्रानुसार तुळशीचे रोप हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे. तुळशीचे धार्मिक तसेच आयुर्वेदात अनेक उपयोग सांगण्यात आले आहे. तुळस तुम्हाला वाईट नजरेपासून वाचवते आणि येणाऱ्या संकटांबाबत सूचित देखील करते.

बहुतेक वेळा तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल की आमच्याकडे तुळशीचं रोप टिकत नाही. ते जळून जातं. ज्या लोकांच्या घरी तुळशीच्या रोपाविषयी ही समस्या असेल तर तुमच्या समस्याचं कारण या लेखात आहे..

जर तुमच्या घरात तुळशीचे रोप अचानकपणे सुकत असेल तर समजा घरात काहीतरी संकट येणार आहे. शास्त्रानुसार तुळस वाळणे म्हणजे घरात गरिबी, अशांतता किंवा संकटाचे वातावरण येण्याचे संकेत असते.

किंवा त्या घरावर आर्थिक संकट नेहमी राहत असते. हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. हे रोप तुम्ही कधीही जमिनीत लावून त्याची पूजा करू नये. तुम्ही ते चौथरा करून किंवा विशिष्ट भांडे, स्टँडमध्येच लावावे.

तसेच तळघरात कधीही तुळस लावण्याची चूक करू नका.तुळशीचे रोप मोकळ्या हवेशीर आणि स्वच्छ ठिकाणी लावावे, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. या वनस्पतीभोवती कधीही अंधार नसावा.

तुळशीच्या रोपाच्या आजूबाजूला अंधार असेल तर ते तुमच्या कुटुंबात नकारात्मक ऊर्जा पसरेल आणि आपत्तीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

घराच्या छतावर तुळशीचे रोप शक्यतो कधीही लावू नये. असे केल्याने झाडाची काळजी घेतली जात नाही आणि तुळशीच्या रोपाची सकारात्मक ऊर्जाही संपते.

याशिवाय घराच्या छतावर या वनस्पतीची लागवड केल्याने तीव्र ऊन, वादळ, पाऊस आणि थंडीची भीती असते कारण या ऋतूंमध्ये रोप अकाली सुकते आणि तुळशीचे रोप अकाली सुकणे शुभ मानले जात नाही.

ज्याचे नुकसान संपूर्ण कुटुंबाला सहन करावे लागत आहे. अशा रीतीने जर तुम्ही तुळशीची योग्य पद्धतीने काळजी घेतली तर वाईट परिणाम कोणतेही होणार नाहीत. त्यामुळे घरी नेहमी सुख, समृद्धी नांदेल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!