नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्या घरातील सदस्य किंवा पाळीव जनावर असामान्य व्यवहार करू लागतात, तसेच विनाकारण तुमचा पैसा खर्च होत असेल, मुलं चुकीच्या मार्गावर जाऊ लागतात आणि तसेच माता तुळशीचे रोपटे सेवा करूनही वाळत असल्यास, तर या गोष्टींचे संकेत आहे की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरली आहे.
याशिवाय घरात काहीही न करता अस्वस्थता जाणवते, घरात येताच मूड बिघडतं, घरातील गोष्टी लवकर खराब होतात. पूजा करण्याची इच्छा होत नाही ,एकमेकातमध्ये देखील ताण तणाव राहत असेल तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे.
त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांनी घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय सांगितले आहेत. याशिवाय प्रत्येकाच्या घरामध्ये ही नकारात्मक ऊर्जा असते.
कारण आपण बाहेरून येतांना आपल्यासोबत सुद्धा नकारात्मक शक्ती येते . तर ही शक्ती नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत, ते केल्यास आपल्या घरामध्ये सकारात्मक विचार आणि ऊर्जा निर्माण होईल.
यामध्ये प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचे म्हणजे,आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी घरात नित्यनियमाने देवपूजा करावी.ही रोज सकाळ ,संध्याकाळ पूजा केली,तरी चालते.
तसेच या पूजेमध्ये आपण घरात उदबत्ती न लावता धूप लावू शकतो.कारण याचा सुवास जास्त होऊन घरातील नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होते. याशिवाय आपण
रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावल्यानंतर, हनुमान चालीसा वाचल्याने त्या घरातील नकारात्मक शक्ती दूर जाते.
तसेच आपण सातत्याने आपल्या घरामध्ये दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा देखील केल्यास,घरातील वातावरण प्रसन्न होऊन , नकारात्मक उर्जा नष्ट होते. घरात सुख-समृद्धी येते.
यासह अनेक एक महत्त्वाचा उपाय रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर, स्वयंपाक बनवताना भात किंवा चपाती ,न खाता सगळ्यात आधी एक चपाती आणि थोडा भात काढून तो कुत्र्याला किंवा गाईला खाऊ घालावा किंवा छतावर कावळ्यासारखी ठेवले पाहिजे.यामुळे पितृदोष कमी होतो.
तसेच सायंकाळी देवाजवळ दिवा लावताना देवाची आरती करावी आणि देवासमोर किंवा माता लक्ष्मीला आपल्या घरांसाठी सुख-समृद्धीचे प्रार्थना करावी.यामुळे आपल्या घरातील किंवा आसपासची नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल.
याशिवाय नियमितपणे देवाला सायंकाळी आपण आरत्या केल्या पाहिजेत. त्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचा निवास राहील, आणि घरात पैसा टिकून राहिल.वाद घालणे टाळावे,
तसेच घरात राग राग करू नये, एकमेकांना समजून घ्यावे. नित्य जप, पूजा, देवांचे स्मरण करावे, त्यामुळे मन शांत राहील. तसेच तुमच्या जीवनात भाग्य बदलेल. घरातील तुटक्या, फुटक्या वस्तू टाकून द्याव्यात,
नासलेले, कुजके पदार्थ, सुकलेली फुले घरात ठेवू नये. स्वामींच्या जपाची छोटी रेकॉर्डिंग नेहमी लावून ठेवावी त्यामुळे घरात विनाकारण भांडण होणार नाहीत. अशावेळी सर्व दोष निवारणासाठी शास्त्रात तरतूद आहे.
जेणेकरून आपण जिवनात खुश राहू शकू. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने॥– श्रीरामरक्षास्तोत्रम् हा मंत्र आपली आपल्या कुटुंबाची वाईट शक्ती पासून नक्कीच रक्षा करेल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.