नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी सगळेच नेहमी प्रयत्न करतात. त्यासाठी शक्य तितके सर्व उपाय करतात.
आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा बरसावी म्हणून इथे काही उपाय आम्ही सांगणार आहोत, जे तुम्ही करू शकता व त्यांचा प्रभावही पाहू शकता.
माता लक्ष्मी आपल्या घरी सदैव वास करेल जर तुम्ही मनापासून, श्रद्धेने हा उपाय केलात तर!
शुक्रवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घरात धनदौलत, सुख समाधान कसे आणावे हे आता नीट वाचा. जर तुमच्या घरात पैश्यांची कमी आहे, दुःख आहे तर हा उपाय नक्की करून पाहा.
जर तुमच्या घरी देव्हाऱ्यात माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर कोणत्याही शुक्रवारी किंवा पौर्णिमेला माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही स्थापन करायची आहे.
दररोज जमत नसेल तर कमीत कमी शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा तुम्ही केली पाहिजे. ही पूजा मनोभावे करायला हवी,
तुमच्या घरी सतत गरिबी असेल, पैसे येत नसतील किंवा पैसे टिकत नसतील तर तुम्ही नक्कीच पूजा केली पाहिजे.
पूजा करताना मन प्रसन्न ठेवावे, आणि प्रथम देशी गाईच्या तुपाचा दिवा लावावा, जर तस शक्य नसेल तर कोणत्याही गाईच्या तुपाचा दिवा लावला तरी चालेल.
यामुळे वातावरण प्रसन्न राहतं आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते. तूप शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावला तरीही चालतो.
माता लक्ष्मीला शीघ्र प्रसन्न करून घ्यायचं असेन तर दोन वातींचा दिवा लावायला हवा. असे केल्याने धनवृद्धी, धनदौलत तुमच्या घरी येते.
शुक्रवारच्या दिवशी मोगऱ्याचे अत्तर
माता लक्ष्मीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर तुम्ही अर्पित करा. त्यामुळे धनप्राप्तीचे नवनवीन योग निर्माण होतात . वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर शुक्रवारच्या दिवशी गुलाबाचे अत्तर मातेला अर्पित करा.
अनेक लोक खूप त्रास सहन करतात ज्यांच्या आयुष्यात दुर्भाग्य आलेले असते व त्यांना मार्ग सापडत नसतो, अशावेळी माता लक्ष्मीला शुक्रवारी चंदनाचे अत्तर अर्पित करावे.
त्यामुळे सौभाग्य तुमच्या आयुष्यात येते. जर घरात सतत कलह होत असतील, वाद होत असतील शांतता नांदत नसेल तर शुक्रवारी केवड्याचे अत्तर मातेला अर्पित करावे.
जर शुक्रवारी अमावस्या आली तर हे उपाय त्यादिवशी अतिशय प्रभावी काम करतात, परंतु जर कोणत्याही शुक्रवारी केले तरी चालतील.
दांपत्य जीवनात जर कलह, कटकट होत असेल तर तुम्ही एक सोपा उपाय शुक्रवारी करू शकता. या दिवशी जवळच्या कोणत्याही लक्ष्मीच्या मंदिरात जाताना सोळा साज शृंगारचे साहित्य घेऊन जायचे आहे.
ते साहित्य देवीला अर्पण करावं त्यामुळे प्रेम पुन्हा फुलतं व सौख्य लाभतं. शुक्रवारी पूजा करून बाहेर पडताना जर आपण चंदनाचे अत्तर लावून बाहेर पडलो तर आपले शुभ काम पूर्णत्वास जाते. तुमचा व्यवसाय उद्योग भरभराटीला जातो.
शुक्रवारी तुम्ही गोमातेला पहिली रोटी अथवा भाकरी चारू शकता अथवा त्यामध्ये गूळ घालून देखील चारू शकता. असं केल्याने माता लक्ष्मीची असीम कृपा अखंड बरसते.
अजून एक उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे अकरा छोटे छोटे नारळ घेऊन तुम्ही ते पूजेदरम्यान तुम्ही समोर पिवळ्या रंगाच्या कपड्यात ठेवायचे आहेत.
पूजा झाल्यावर मनोभावे ते नारळ बांधून ते गाठोडे किचन मध्ये पूर्व दिशेला वरती बांधून ठेवायचे आहेत. तसेच घरातील कुलदेवी मातेला विड्याचे म्हणजेच नागवेलीचे पान 2 आणि
सुपारी 1 प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी अर्पण करा. कुलदेवी माहीत नसल्यास जाणून घ्या. कुलदेवता नमः म्हणून रोज 108 वेळा जप करा. नंतर हळूहळू देवीचा आशीर्वाद नक्की मिळेल.
वरील सर्व उपाय हे तुम्ही तुम्हाला होणाऱ्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आणि त्यासाठी मातेला प्रार्थना करण्यासाठी वापरा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.