नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, सकाळी देवपूजा करताना, सायंकाळी दिवा लावताना त्यासोबत अजून एक गोष्ट केल्याने त्याचे जास्त फळ मिळते. काही लोकांच्या घरी खूप आजारपण असते, ते कमी होत नसते, काही लोक सतत आजारी असतात त्यामुळे त्यांच्या आयुष्यात सर्वत्र अंधारच असतो.
आजारी असणे म्हणजे कमकुवत असणे, आजारी असल्यावर घरात लक्ष्मी टिकत नाही, घरी असताना वाईट विचार येतात. त्यामुळे शास्त्र असे सांगते की फक्त दिवा न लावता एक शुद्ध वस्तू त्यासोबत लावा म्हणजेच तुमच्या घरातील नकारात्मक विचार निघून जातील.
देवघरात दिवा हा लावलाच पाहिजे, दिवा हा सकारात्मक विचार असल्याचे प्रतिक मानले जाते. घरातील समृद्धी, सुख, चैतन्य राखून हा दिवा ठेवतो.
अंधारातून प्रकाशात नेण्याचे काम हा दिवा करतो, दिवा लावल्याने देवी देवतांचा आशीर्वाद कायम सोबत राहतो असे हिंदू पुराण सांगते.
त्यामुळे चांगली भावना घेऊन येणारा हा दिवा लावलाच पाहिजे. हा दिवा लावत असताना आपण एकच काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे अशी की या दिव्यात एक वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे तुमच्या घरातील सर्व लोक निरोगी राहतील.
हा उपाय म्हणजे घरगुती उपाय असून त्याचे कोणतेही तोटे नसून फक्त फायदेच आहेत. घरात जसा दिवा लावल्याने प्रसन्न वाटते, सर्व वातावरण प्रसन्न होते, उल्हासपूर्ण होते, तसेच ही एक वस्तू अशी आहे जी संपूर्ण नकारात्मक गोष्टी नष्ट करते.
घरातील अंधार नष्ट दिवा करतो, नजरात्मक ऊर्जा बाहेर पाठवतो तो म्हणजे दिवा. दिवा लावत असताना तो एकदम स्वच्छ असावा, तसेच तो दिवा फुटलेला नसावा, हा दिवा स्वच्छ पुसून स्वच्छ तेल अथवा तुपाने लावा. तेल आणि तूप एकत्र लावू नये.
एका दिव्याला दुसरा दिवा अजिबात लावू नये. या दिव्यामध्ये एक कापूर वडी टाकायची आहे. तसेच काही अन्य उपाय न करता फक्त रोज जेव्हा दिवा लावाल तेव्हा त्यामध्ये एक वडी कापूर टाका. याचे परिणाम तुम्हाला नक्की जाणवतील.
त्यामुळे तुमच्या घरातील जीव जंतू जे आपल्या शरीराला हानीकारक आहेत असे जंतूपासून तुमचे संरक्षण होईल.
घरी जर कुणी आजारी असेल तर त्याच आजारपण निघून जाईल. तसेच इतर नकारात्मक गोष्टी समूळ नष्ट होतील, फक्त रोज दिवा लावताना कापूर दिव्यासोबत जळाला पाहिजे. तसेच लवंग सुद्धा टाका. घरात वातावरण शुद्ध राहते.
कापूर हा शुद्धतेचे प्रतीक मानला जातो. कारण कापूर हा घरातील किंवा जिथे ठेवाल, लावाल तिथली नकारात्मकता नष्ट करतो .
बाधित जीव जंतू हे नाश करण्याचे काम हा कापूर करत असतो. याचे हिंदू पुराणात तसेच वैज्ञानिक महत्व देखील आहे,
त्यामुळेच तर सध्या आपण जवळ कापूर ठेवतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत नाही, जंतुसंसर्ग होत नाही,
कोणत्याही सांसर्गिक आजारापासून संरक्षण करण्याचे काम हा कापूर करतो. तसेच रोज संध्याकाळी शुभम करोति स्तोत्र म्हणावे. माता लक्ष्मीचा वास अखंड राहतो.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.