नशीब साथ देत नसेल तर दही साखरेचा हा टोटका नक्की करून पहा,भाग्योदय होईल, नशीब साथ देईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्या जीवनातील प्रत्येक कामात वारंवार अडचणी येत असतील किंवा नशीब साथ देत नसेल, अशावेळी हार मानन्याऐवजी सतत प्रयत्न केले

आणि काही सोपे उपाय केले तर अडचणी सहज दूर केल्या जाऊ शकतात. काहीवेळा नशीब आपल्याला साथ देत नाही आणि हे यश मिळाले नाही.

या नशिबाची साथ हवी असेल तर काही प्रभावशाली उपाय ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितले आहेत. हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार आपला भाग्योदय करणारा पहिला अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण हा उपाय देवाशी निगडित आहे.

हा उपाय म्हणजे आपण दररोज नित्य नियमाने “ओम गण गणपतये नमः”या मंत्राचा अधिकाधिक संख्येचा जप केल्यास आपल्या घरात किंवा जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते.

तसेच दुसरी गोष्ट जेव्हा आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातांना आपल्या हातावर दही आणि साखर ठेवल्यास आपलं काम मार्गी लागते ,असे सांगितले जाते. याशिवाय

आपल्या मुख्य दरवाजासमोर नेहमी रांगोळी काढावी. तसेच आपला उंबरठा हा नेहमीच स्वच्छ आणि सुंदर ठेवला पाहिजे. तसेच त्यावर काही स्वस्तिक काढाव त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात प्रसन्न होईल.

याशिवाय प्रत्येक शुक्रवारी नियमितपणे आपण श्रीसुक्ताचा पाठ केल्यास, आपल्यावर आणि आपल्या घरावर माता लक्ष्मीचा कृपा-आशीर्वाद मिळतो.

यामुळे नियमित श्रीसूक्तम्चा पाठ केल्याने लक्ष्मी प्रसन्न होत असते व कृपा बरसू लागते.

तसेच आपल्यावर खूप मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली असेल, तर पाच सलग गुरुवार,कोणत्याही सौभाग्यवती महिलेला सौभाग्य सामुग्री दान करावी.

असे केल्याने आपल्या जीवनातून आर्थिक समस्यांपासून आपली सुटका होते.

आपल्या घरातील फरशी मिठाच्या पाण्याने पुसून काढली तर आपल्या घरातुन मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जेचा ऱ्हास होण्यास सुरुवात होते.

आपल्या घरामध्ये वेगवेगळे लोक येत असतात ,काही वेळा या लोकांच्या बरोबर मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत असते,

ती नष्ट होण्यास मदत होते.मग ही ऊर्जा मीठयुक्त जलाने बाहेर पडल्यास, आपल्या जीवनात भाग्योदय होण्यास सुरुवात होत असते.

याशिवाय पौर्णिमा तिथीमध्ये मनोभावे आपण पिंपळाच्या वृक्षला एक तांब्या जल अर्पण केल्यास आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा होत असते. तसेच मोठ्या आर्थिक समस्या माता लक्ष्मी च्या कृपेने नक्की दूर होतात.

याशिवाय स्फटिक श्रीयंत्र तुम्ही पूजा करत असाल तर त्यावर कमळाच्या बियाची माळ अर्पण केल्यास हे श्रीयंत्र अत्यंत चैतन्यमय होण्यास मदत होते.

त्याच्या सकारात्मक लहरींनी आपलं घर चैतन्यमय बनते. ज्यामुळे घरातील समस्या दूर होतील व घर आनंदी राहील.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!