14 वा अध्याय का व कसा वाचावा, स्वामींना काय प्रिय आहे?…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ! तुमच्या जीवनात खूप संकट- अडचणी येत असतील तर रोज तुम्ही याचे वाचन करा, स्वामींची कोणतीही सेवा वाया जात नाही, स्वामींचे नामस्मरण सुद्धा कधीच वाया जात नाही,

काही गोष्टींना थोडा उशीर होतो पण स्वामी त्यांच्या भक्ताला, यांच्या सेवकाला फळ देतातच, अनेकांना याची प्रचिती देखील आली आहे. कधी काय करावे समजत नाही, काही केलं तर त्याचा परिणाम मनासारखा होत नसतो,

आपल्या परीने आपल्या मनासारखे होत नसते, पण स्वामींच्या मनासारखे होत असते म्हणून आपण सगळं काही स्वामींवर सोडून द्यावं. तेच आपल्यासाठी जे करायचे तेच करतील ,

स्वामींनी सांगितलेला हा उपाय तुम्ही नक्की करा, हा उपाय तुमच्या जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर करेल, तुमच्यावर , तुमच्या परिवारावर आलेले सगळे संकट ,सगळ्या अडचणी, सगळ्या समस्या दूर करेल. तुम्हाला फक्त एक छोटेसे वाचन करायचे आहे,

तुमच्या जीवनात खूप संकट असतील ,अडचणी असतील, तर तुम्ही रोज याचे वाचन करा, तुम्हाला वाचायचे आहे ते म्हणजे गुरुचरित्र 14 अध्याय वाचायचा आहे. तुमच्याकडे गुरुचरित्र असेल तर तुम्ही 14 वा अध्याय बघा

आणि त्याचे वाचन रोज करा. तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही, अन्य कोणत्याही मंत्र जपाची गरज नाही , तुम्ही फक्त गुरुचरित्र मधील 14 वा अध्याय वाचायचा आहे. तुम्ही व्यापारी असाल,

तुम्ही नोकरीला असाल, तुम्ही घरात राहात असाल , तुम्ही महिला असाल , तुम्ही लहान मुलं असाल, तुम्ही शाळेत जाणारी मुले असा किंवा तुम्ही कॉलेजला जाणारी मुले असला तरी तुम्ही गुरुचरित्र मधील 14 वा अध्याय वाचावा,

अगदी मनापासून. हाच उपाय तुम्हाला सगळ्या संकटांपासून मुक्त करू शकतो, जर तुमच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल, गुरुचरित्रातील 14 वा अध्याय वाचन करा, बिजनेस चालत नाहीये तेव्हा 14 वा अध्याय वाचा,

काही अडचणी येत आहेत तेव्हा 14 वा अध्याय वाचावा, जर तुमचे कुठेतरी पैसे अडकले आहेत तेव्हा 14 वा अध्याय वाचा. सगळ्या समस्यांचे एकच सोलुशन आहे ते म्हणजे गुरुचरित्र मधील चौदावा अध्याय होय.

तुम्हाला जीवनात खूप सार्‍या, कोणत्याही अडचणी , संकटं असतील तर तुम्ही गुरुचरित्र मधील चौदावा अध्याय वाचायला आजपासूनच सुरुवात करून टाका आणि बसण्याची वेळ तुम्ही ठरवा .

तुम्हाला सकाळी वाचायचा आहे की संध्याकाळी . पण तुम्हाला जमले तर तुम्ही याचे वाचन सकाळीच करा, तुमची अंघोळ जेव्हा होते , तुम्ही काहीच खात पीत नाही, अंघोळ करून डायरेक्ट देवासमोर जाऊन पहिले याचे वाचन करा ,

नंतर सगळे चहा पाणी घ्या. तुम्ही जसं जमेल तसं करा. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही कोणती तरी एक वेळ काढून घ्या की ह्या वेळेला मला वाचायचे आहे, आणि हीच वेळ माझ्यासाठी सोयीस्कर आहेत

तर त्या वेळेनुसार रोज यामध्ये बदल करायचा , म्हणून आधीच पहिल्या दिवसापासूनच एक उत्तम वेळ ठरवून घ्यावी अन त्या वेळेनुसार आपल्याला वाचायचे आहे. हा अध्याय म्हणजे तुमच्या सर्व अडचणींचा डोंगर सर करण्यासाठी उत्तम मार्ग आहे तो तुम्ही करून बघा.

हे एका दादांच्या अनुभवावरून सिद्ध होते. कारण या दादांना कोविड दरम्यान आर्थिक नुकसान खूप झालं. अगदी कंगाल झाले.

पण हार मानली नाही. गुरूचरित्र पारायण अध्याय 9 आणि 14 यांचं नियमाने पठण केल आणि स्वामी लीला घडली. खूप मनापासून परत मेहनत केली. सर्व गुंता अलगदपणे सुटला. श्री स्वामी समर्थ.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!