नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ! सबसे बडा गुरू… गुरूसे बडा गुरू का ध्यास… और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज… तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे…! अशा शब्दांंमधे स्वामी समर्थांंची महती वर्णन केली जाते.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची सेवा करणे हे आपलं भाग्य. स्वामींची भक्ती करणे हे आपलं भाग्य, रोजचा धर्म आणि कर्म असावे. स्वामींची भक्ती , त्यांचे उपदेश सर्व स्वामीभक्तांनी आचरण केल्यास जीवन एक सुखद अनुभूती आहे हे जाणवेल.
स्वामींनी अनेक गोष्टी जीवन जगताना सांगितल्या आहेत, जर आपण त्यांचं मनापासून प्रामाणिकपणे पालन केले तर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसे स्वामी सुख दुःखात आपल्या पाठीशी राहतात.
श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत.
सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते. जो भक्त स्वामींची पूजा करताना तन मन धन अर्पण करतो,
त्याच्यावर स्वामी नेहमी प्रसन्न राहतील, त्याच्या पाठीशी स्वामी नेहमी राहतील.स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली , पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल.
काही वेळेस तुमच्या मनासारखं काहीच घडत नाही, सतत तुम्हाला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते, घरात आजारपण आहे, इतर सर्व खर्च यामुळे तुम्हाला खूप टेन्शन आले आहे तर स्वामींचा स्मरण करा, संपूर्ण लक्ष केंद्रित करून करा.
असा एक मंत्र स्वामी सेवेत सांगितलेला आहे तो मंत्र म्हटला तर तीन ते पाच मिनिटातच तुम्हाला याचा फरक आणि चमत्कार दिसायला सुरुवात होईल, आत एकच शुद्ध व निर्विकार भावाने, निस्वार्थीपणे हा जपायचा.
आजच्या या काळात सगळीकडून नकारात्मक गोष्टी आपल्या कानावर पडत आहेत, ज्या सभोवताली घडत आहेत, या सर्व गोष्टीतून वाचण्यासाठी हा एक मंत्र जो सर्व दुःख दूर करेल. हा मंत्र आहे ना तो अतिशय प्रभावी मंत्र आहे ,
हा स्वामींच्या मुखातील मंत्र आहे आणि आपण हा मंत्र म्हणला पाहिजे, जपला पाहिजे कारण स्वामी हे जगाचे पालन करते आहेत, ते ब्रह्मा-विष्णू-महेश यांचाच एक अवतार आहेत, आपण आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी नेहमी स्वामींचे नाव घेतो.
इच्छा काहीवेळा पूर्ण होत नाहीत, त्याला काही ना काही अडचणी येतात, पण तुम्ही हा स्वामी मुखातील मंत्र बोलला तर पाच ते तीन मिनिटातच तुम्हाला याचा चमत्कार दिसेल . मंत्र अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे . हा मंत्र आहे ,
शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो
शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो
शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो
हा स्वामी मुखातील मंत्र बोला, तुम्हाला याचा फरक लगेच कळेल, जाणवू लागेल. हा मंत्र बोलल्याने एक प्रसन्न वातावरण तयार आपल्यामध्ये होईल व आपण खूप फ्रेश होतो. तुम्ही हा मंत्र जपला तर तुमच्या घरात सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य पैसा संपत्ती सर्व काही येऊ लागेल.
लगेचच भगवंताची कृपा आपल्यावर होईल आणि याचा परिणाम इतका जलद आहे की या मंत्राचा तुमच्यावर लगेचच फरक पडेल.
तसेच तुम्ही स्वामी सेवेत ही एक चूक कधीच करू नका, सेवेचा लाभ, सेवेच फळ तुम्हाला मिळणार नाही, मग तुम्ही कितीही सेवा केली, कितीही मंत्र जप केला, कितीही पारायण वाचन केले किंवा कितीही स्वामीच्या समोर बसला तरी त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही.
एक चूक तुम्ही कधीच करू नका, काही लोक सकाळी सेवा करतात, दुपारी करतात, संध्याकाळी करतात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तेव्हा करता, ही सेवा घरात करतात, मठात करतात, तुम्ही कितीही सेवा करा, अर्धा तास, एक तास, दोन मिनिट , पाच मिनिट केली तरी चालेल पण चूक कधीच करू नका
आणि ही चूक आपल्याकडून तेव्हाच होते जेव्हा आपण देवघरा समोर बसतो, स्वामींच्या मूर्ती- स्वामी च्या फोटो समोर बसतो आणि चुक कोणती आहे तर बऱ्याच वेळेस जे भक्त असतात, सेवेकरी असतात ते स्वामींच्या समोर म्हणजे देवघरा समोर आहे त्या अवस्थेत जाऊन बसतात, त्यांना स्वामींचा मंत्र जप करायचा असतो,
किंवा काही वाचन करायचं असतं, तेव्हा ते कुठूनही बाहेरून येतात किंवा काहीही घरात करत असतात, जेवण करत असतात किंवा काही काम करत असतात तेव्हा त्यांना वाटतं की त्याला आता मंत्र जप करून काहीतरी वाचन करू , पारायण करू, स्तोत्र वाचन करू, स्वामींसमोर बसून संध्याकाळी, सकाळी, दुपारी तेव्हा ते डायरेक्ट जाऊन स्वामी समोर बसतात,
दिवा – अगरबत्ती लावतात आणि मंत्र जप सुरू करतात. त्यांची सेवा असते ती मनोभावाने ते करत असतात परंतु हीच त्यांच्याकडून सगळ्यात मोठी चूक होते की ते डायरेक्ट जाऊन बसतात, पण असं कधीच करू नका, तुम्हाला जेंव्हा केव्हाही स्वामी समोर बसायचे आहे,
देवघरासमोर बसायचे आहे तर तुम्हाला आधी पवित्र व्हावे लागेल आणि पवित्र आपण तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही सगळ्यात आधी हात पाय तोंड स्वच्छ धुऊन त्यानंतरच तुम्ही देवघरासमोर बसा. स्वामींच्या समोर बसा . तुम्ही थोड्या वेळासाठी जरी बसलात तरी स्वामी सेवेचे नियम पाळूनच सेवा करावी.
स्वामी समोर बसायचे असेल तर पुन्हा जाऊन तुम्ही हात पाय तोंड धुवा आणि मगच स्वामींच्या समोर बसा , जर तुम्ही घरीच आहात, कुठे केला नाहीत तरी तुम्हाला हात पाय स्वच्छ धुवावेत, हा नियम स्वतःला लावून घ्यायचा आहे,
तुम्हाला शुद्ध पवित्र होऊन स्वामींसमोर बसायचे आहे , पवित्र मनाने , स्वच्छ अंतकरणाने प्रार्थना करा यामुळे तुमचं मन पूर्णपणे शांत होईल. स्वच्छतेने तुमचं मन अधिक प्रसन्न व एकाग्र राहते, सर्व मलिनता निघून जाते, नकारात्मक ऊर्जा निघून जाते, सर्वत्र सकारात्मक ऊर्जा भरल्याने तुमचं शरीर शुद्ध होते व मन सात्विक होते.
अशी स्वामिसेवा नक्कीच फळाला येते, यामुळे स्वामींची भक्ती दृढ होईल, स्वामी प्रसन्न होतील, स्वामींचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहतील. त्यामुळे तुमचं जीवन नक्कीच सफल होईल,
या काही छोट्या आळशी बनवणाऱ्या चुका असतात त्या आपल्याला भक्तीच्या फळापासून वंचीत ठेवत असतात त्यामुळे या चुका स्वामींची सेवा करणाऱ्यांनी नक्की लक्षात ठेवून टाळाव्यात.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.