हे वाचल्यावर तुमची प्रत्येक शंका दूर होईल हे नक्की…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करुदेत. आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेऊदेत. हीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करूया. काही लोक प्रश्न विचारतात आम्हाला काहीच करावंसं वाटत नाही आम्ही काय करू?

आमचं मन कुठेच लागत नाही? आम्हाला एकांत हवा आहे! पण मन नेहमी भरकटत राहते. आपण एका कथेतून ते थोडं समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. स्वामी म्हणतात की जोपर्यंत तुम्ही स्वतः तो मार्ग बनवत नाही तोपर्यंत तुम्ही त्या मार्गावर जाऊ शकत नाही.

एक गुरू आपल्या शिष्यांना ध्यान करायला शिकवत होते. तेव्हा एका शिष्याने सांगितलं की मला काही समजत नाहीये. मी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो का? तुम्ही नक्कीच प्रश्न विचारू शकता. मग शिष्य म्हणाला मी पाणी पिले तर माझी तहान भागते किंवा कोणीही पाणी पिले तर त्यांची तहान भागते मग याच प्रमाणे ध्यान का होत नाही?

आपण ध्यान करतो तेव्हा आपल्यापैकी काही आधी काही नंतर ध्यान समाधी लाभते आणि आपल्यापैकी काहींना कधीच ती अवस्था प्राप्त होत नाही. असे का होते? त्याप्रमाणे पाणी सर्वांची तहान भागवते त्याचप्रमाणे ध्यानाने प्रत्येकाच्या ज्ञानाचे डोळे उघडले पाहिजे. पण तसे होत नाही.

गुरू म्हणाले उद्या कोणी तरी आम्हाला भोजन करायला बोलवल आहे उद्या तू माझ्यासोबत तिथे चल मी तिथे तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. त्या दिवशी दोघे ही गुरू-शिष्य जेवायला एका श्रीमंताच्या घरी पोहोचले. त्याच्या बायकोने त्यांना जेवायला बोलावले होते. दोघेही जेवायला बसले.

तेव्हा त्या स्त्रीचा पती देखील त्यांच्यासोबत जेवायला बसतो. जेवणातील एक घास खाल्ल्यानंतर तो त्याच्या सर्व नोकरांना बोलतो की हे कोणतं तुम्ही निरुपयोगी जेवण बनवलं आहे. याला काहीच चव नाहीये तेव्हा फेकून देतो आणि सर्व नोकरांना सांगतो की पुन्हा जरा चांगले जेवण करून आणा.

मग श्रीमंत माणसाच्या पत्नीने त्या दोन्ही गुरुशिष्यांची क्षमा मागितली आणि त्यांना जेवण वाढलं. गुरु शिष्य जेवले पण गुरूंनी त्यांच्या ताटात दोन रोट्या शिल्लक ठेवल्या. त्या महिलेला म्हणाले की मुली तू मला या दोन रोट्या बांधून देऊ शकतेस का? महिलेने त्या दोन रोट्या बांधून दिल्या आणि त्या दिल्यानंतर दोघेही तिथून निघून गेले.

वाटेत गुरूंनी शिष्याला विचारले तुला जेवण कसे वाटते. त्यावर शिष्य म्हणाला जेवण स्वादिष्ट होते. मला ते खूप आवडले. ते खाल्ल्यानंतर मला खूप आनंद झाला. गुरु म्हणाले तुला यापेक्षा जास्त काही वाटले नाही? शिष्य म्हणाला गुरुदेव यापेक्षा चांगले काय असू शकते? माझी भूक नाहीशी झाली आणि पोट देखील भरले.

मग गुरु शिष्याला बोलले जेवण तरी चांगले होते. मग त्या स्त्रीच्या पतीला जेवण का आवडले नाही? जेवण तर सर्व एकाच प्रकारची होते. तरीही त्याला जेवण का आवडले नसेल? मग शिष्य म्हणाला तुम्ही बरोबर बोलत आहात गुरुदेव मला काहीच समजत नाही. तुम्हीच आता या बद्दल मला काहीतरी सांगा.

मग गुरु म्हणाले आता तुम्ही माझ्या सोबत चालत राहा. गुरु शिष्य बरंच पुढे गेले. शिष्य गुरूंना म्हणाला गुरुदेव आम्ही आमच्या आश्रमाच्या वाटेवर नाही आहोत. आपण कुठेतरी वेगळे ठिकाणी जात आहोत.

मग गुरु म्हणाले तू फक्त चालत राहा. थोडं चालत आल्यानंतर एक अश्रू वाहणारा माणूस म्हणून तिच्या समोर आला आणि त्यांच्या पाया पडला.

हे देवा मला मदत करा. मी तीन दिवसांपासून उपाशी आहे. काहीच खाल्ले नाही. तुम्ही मला काहीतरी खायला द्या. गुरूने त्या माणसाला एका झाडाखाली बसवले आणि त्या श्रीमंत स्त्रीने दिलेल्या दोन रोट्या काढल्या आणि त्याला खायला दिल्या.

रोट्या बघताच त्याचे डोळे चमकले. त्याने लगेचच त्या दोन रोट्या घेतल्या आणि खाल्ल्या जेवताना त्या व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येत होते.

तो रडत रडतच रोट्या खात होता आणि पाया पडत होता. जणू काही अदृष्य शक्तिला तो म्हणत होता की या रोट्या साठी तुझे खूप खूप आभार मानले. जेवल्यानंतर त्याने गुरुंना नमस्कार केला आणि आभार मानले.

गुरूने त्या व्यक्तीला अन्नाची चव विचारली कसं होतं ते म्हणाले होते की त्यावर तो म्हणाला तर फक्त जेवणच नव्हे त्यात परमात्मा होता.

त्यांनी माझे आयुष्य वाढवले असे म्हणत ती व्यक्ती तिथून निघून गेली. शिष्याला सांगितले त्याने तेच जेवण केले आणि चविष्ट होते. पण त्या माणसाला त्याची चव येत नव्हती. उलट तो त्याला देव परमात्मा आणि जीवन पाहतो.

यावरून असे दिसून येते की वैयक्तिक समाधान आणि अन्नप्रक्रिया यात फरक आहे. पहिल्या व्यक्तीला चव कोणती समजले नाही. ते सोपे नसते आणि तुम्हाला थोडी थोडी चव येते आणि आता या व्यक्तीस त्यात असीम समाधान असते.

ध्यानात ज्याला जितकी तहान लागते तितक्या लवकर तो मार्ग काढतो. त्या शिष्याला आता त्याच्या पूर्ण त्यांची उत्तरे मिळाली होती. तो आता समाधानी झाला होता. पण आपल्याला अजूनही आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही.

प्रश्न हा होता की आमचं मन का लागत नाही. जिथे लगेच मन लागतं तिथे मन नसतं कारण पळून जाणे हा मनाचा स्वभाव आहे. त्यामुळे विचार करून शांतपणे प्रत्येक गोष्ट करावी.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!