कुलदैवत माहिती नसेल तर असे माहीत करून घ्या! उपासना सेवा अशी करा, 24 तासात समजेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, प्रत्येक व्यक्ती एक कुटुंबात व एक कुटुंब एका कुळा चे असते. यामुळे खूप काही गोष्टी घडतात. आपल्यावर कृपा असेल आपण उपासना करत असू तर प्रत्येक कामात यश मिळते आणि जर माहीत नसेल तर मात्र नक्कीच माहीत करून घ्या. कुलदेवता आपली, आपल्या कुटुंबाची, आपल्या घराण्याची कुलदेवता माहित असणे फार महत्वाचं असत.

अनेकदा आपण आपल्या घरातील विविध प्रकारच्या समस्यांसाठी वेगवेगळे उपाय करतो. घरांमध्ये सतत आजारपण आहे, लोक सतत आजारी पडतात, कितीही औषधोपचार करावा मात्र रोग बरे होत नाहीत.

घरावर एकामागून एक संकट येत राहतात, समस्या येत राहतात, अडचण येत राहतात. कधी कधी खूप प्रयत्न करून सुद्धा व्यापार, व्यवसाय धंदा व्यवस्थित चालत नाही, प्रगती होत नाही. घरात पैसा येत नाही.

सातत्याने पैशाची टंचाई असते, तंगी असते. मुलाबाळांच्या काही समस्या आहेत, संतान सुख नाही, या विविध प्रकारच्या समस्या जर असतील.आपण या समस्येतून मुक्त होण्यासाठी काही उपाय सुद्धा केलेले असतील, काही टोटके केलेले असतील.

वेगवेगळ्या देवी-देवतांना अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, किंवा विविध प्रकाराच्या तिथींना प्रसन्न करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला असेल. मात्र तरीसुद्धा जर हे उपाय, हे टोटके कार्य करत नसेल, याचा काहीही उपयोग होत नसेल.

तुमची कुलदेवता म्हणजेच तुमचं कुलदैवत हे तुमच्यावर रुष्ट आहे. आणि तुमच्या कुलदेवतेस प्रसन्न करणं, तुमच्या कुलदेवतेला प्रसन्न करवण अत्यंत महत्त्वाचे आहे. कधी कधी एखादी बाहेरची व्यक्ती, किंवा अगदी आपल्या जवळची व्यक्ती,

काही अशा प्रकारच्या क्रिया करते की आपली कुलदेवता बांधली जाते.जेव्हा जेव्हा तुमची तुमच्या कुटुंबाची कुलदेवता बांधली जाते तेव्हा तुमच्या घराची प्रगती थांबते. अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती तुमच्या घरात वास करू लागतात.

ज्या कुटुंबावर कुलदेवतेची कृपा नसते, ज्या कुटुंबाला आपल्या कुलदैवतेचा आशीर्वाद मिळत नाही. त्या कुटुंबावर अनेक प्रकारच्या समस्या या नकारात्मक शक्तींच्या रूपातून येत असतात.

नकारात्मक शक्ती आपल्या कुटुंबावर हवी होतात. आणि मग घरामध्ये सातत्याने भांडण होण, अशांती पसरण, दरिद्रता, अलक्ष्मीचा वास निर्माण होणं, या सर्व गोष्टी घडू लागतात. गरिबी, दरिद्रता, कंगाली, सातत्याने रोग, आजारपण आपल्या घरात येऊ लागत.एकच महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात ठेवायचे की,

आपली कुलदेवता प्रसन्न व्हायला हवी तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हायला हवा. आणि तो नक्की कसा करायचा. अनेकांच्या बाबतीत तर असं दिसून येतं की आपले कुलदैवत त्यांना माहीत नसते. आपले कुलदैवत काय आहे हे जाणून घेण्याचा सुद्धा अनेकजण प्रयत्न करत नाहीत.कोणत्याही देवी-देवतांची साधना करा, पूजा करा, अर्चना करा. मात्र तुमच्या कुलदेवतेची पूजा, तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठीची पूजा, तुम्ही दररोज नित्य नियमाने करायला हवी.

जर तुमची कुलदेवता तुमच्यावर अप्रसन्न असेल, तर आजचा उपाय तुमच्या कुलदेवतेला नक्की प्रसन्न करेल.कुलदेवता तुमच्या घरात एका आठवड्याच्या आत तुम्हाला दर्शन देईल. कदाचित स्वप्नामध्ये तुम्हाला त्यासंबंधीचे संकेत मिळतील. किंवा जरी स्वप्नातही नाही मिळाले, तरी सुद्धा दैनंदिन जीवन जगताना एका आठवड्याच्या आत तुम्हाला असे काही संकेत मिळू लागतील. की तुमची कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे.तिचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. हा उपाय करण्यासाठी अगदी साधी, अगदी कुठेही मिळणारी, अगदी गावात, खेड्यात, कोणत्याही भागात मिळणारी, एक सात ते आठ प्रकारची सामग्री आपल्याला लागणार आहे. साहित्य आपल्याला लागणार आहे.

पूर्ण श्रद्धेने निष्ठेने जर आपण हा उपाय केलात, तर कोणी कितीही मोठा तंत्र-मंत्र केलेला असो, बाधा केलेली असो, तुमच्या कुलदैवताला ज्याने बांधून ठेवलेला आहे तुमच्यासाठी.मोठ्या व्यक्ती आहेत, बुजुर्ग व्यक्ती आहेत, ज्येष्ठ व्यक्ती आहेत, आजी-आजोबा असतील, पंजोबा असतील, तर त्यांच्याकडून तुम्ही तुमचं कुलदैवत जाणून घ्या. आणि त्या कुलदैवताची तिथी कोणती आहे. वेगवेगळ्या कुलदैवताची वेगवेगळी तिथी असते. तर तिथी कोणती आहे हे जाणून घ्या.

त्यात तिथीच्या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे. आणि जर हे जाणून घेऊन सुद्धा, तुम्ही हे जाणून घेण्यास असमर्थ असाल, म्हणजे की तुम्हाला माहित करून घेता आल नाही की तुमच्या कुलदैवताची तिथी कोणती आहे. किंबहुना तुमचं कुलदैवतच तुम्हाला जाणून घेता आल नाही. तरीही काळजी करू नका.

कुलदैवत जरी माहित नसलं तरी सुद्धा, त्याशिवाय ही आपण हा उपाय करू शकतो. आणि ती करण्यासाठी जी तिथी आहे, ती शुक्ल पक्षातील आता शुक्लपक्ष म्हणजे काय, तर प्रत्येक महिन्यात दोन पक्ष येतात एक “शुक्लपक्ष”, आणि दुसरा “कृष्णपक्ष”. तुम्ही कोणत्याही कॅलेंडरमध्ये, दिनदर्शिके मध्ये, सध्या कोणता पक्ष चालू आहे, शुक्लपक्ष चालू आहे की कृष्ण पक्ष हे जाणून घेऊ शकता.

तर तुम्हाला जर तुमच्या कुलदैवताची तिथी माहित नसेल, तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीस. शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीस आपण हा उपाय करायचा आहे. जर अष्टमी तिथीस काही प्रॉब्लेम असतील, तर शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या, पौर्णिमा शुक्ल पक्षातच येते. पौर्णिमा तिथीस आपण हा उपाय करू शकता.लाल रंगाचा कपडा, एक साधारण आपलेला एक पोचली बांधायची आहे, एक पुचुंडी बांधायची आहे.

सात ते आठ वस्तू त्या लाल कपड्यात टाकायच्या आहे. छोट्या आकाराचा, अगदी हातभर आकाराचा लहान लाल कपडा घ्यायचा आहे.एक लाल कपडा घ्यायचे आहे, त्यावरती कोळसा ठेवायचा आहे, कोळसा ठेवल्या नंतर त्यावर भस्म टाकायचे ठेवायचा आहे, चंदन पावडर टाकायची, हळकुंड ठेवायचे, कुंकू व्हायचे आहे. आणि त्यानंतर हा लाल कपडा व्यवस्थित त्याची पोटली बनवायची आहे, पुरचुंडी बांधायची आहे.

आणि हे बांधण्यासाठी लाल रंगाचाच धागा म्हणजे लाल रंगाचाच दोरा वापरायचा आहे. व्यवस्थित ही पुरचुंडी बांधा. आणि बांधल्यानंतर ही पुरचुंडी आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, ज्या दरवाज्यातून आपण आपल्या घरात प्रवेश करतो, आपल्या घरात येतो. त्या मुख्य दरवाज्याच्या बाजूने म्हणजे घराच्या आतल्या बाजूने लावायचे आहे.

हे बाहेर लावायचे नाहीये. अनेकदा आपण तुरटीचे उपाय पाहिलेले आहेत. धनप्राप्तीसाठी तुरटी कुठे बांधायची आहे हे पाहिलेले आहे. हा उपाय आपल्याला घराच्या आत करायचा आहे. मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूने, जी चौकट आहे चौकटीच्या आतल्या बाजूने, बरोबर मधोमध चौकटीच्या मधोमध आपल्याला ही पोटली बांधायची आहे.बांधण्यासाठी सुद्धा लाल रंगाचाच धागा वापरायचा आहे. जर त्या ठिकाणी बांधण्यासाठी तुम्ही जर खिळा जर ठोकणार असेल, तर हा खिळा पितळी असेल, पितळी या धातूपासून बनलेला असेल. जर तो खिळा असेल तर तो अति उत्तम मानला जातो. नसेल तर तुम्ही दुसऱ्या वस्तूंचा वापर करू शकता.

बांधल्यानंतर त्या दिवसापासून एक फक्त नियम आपण पाळायचा आहे. आपण दररोज आपल्या कुलदैवताची पूजा करायची आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की तुमचं कुलदैवत माहित करून घ्या. इतकही अवघड नसतं. आता कुलदैवत जर माहीत नसेल, तर तुम्ही ते माहीत करून घ्या.

तर हा उपाय केल्यानंतर त्या दिवसापासून, त्या तिथीपासून, दररोज नित्य नियमाने आपण आपल्या कुलदैवताची पूजा करायची आहे. आता हा जो उपाय सांगितला तो उपाय स्त्रियांनी करू नका. घरातील महिलांनी हा उपाय करायचा नाहीये. घरातील जे पुरुष आहे, त्यातल्या त्यात जे जेष्ठ आहे, वयाने सर्वात मोठे आहेत, अशा पुरुषांनी हा उपाय करायचा आहे.

असे पुरूष नसतील तर ती मुलं सुद्धा हा उपाय करू शकतात. मात्र मुलींनी, स्त्रियांनी, महिलांनी हा उपाय करायचा नाही. तर हा उपाय केल्यानंतर त्या दिवसापासून दररोज आपल्या कुलदैवताची आपण इतर देवी देवतांसोबत पूजा-अर्चना करायची आहे.

ज्या प्रकारे आपण आपल्या देवघरात विविध देवदेवतांची पूजा करतो.अगदी त्याच प्रकारे या सर्व देवी-देवतांची आपल्याला पूजा करायची आहे, व आपल्या कुलदैवताची पूजा करायची आहे. आणि आपल्या दररोजच्या जीवनामध्ये ज्या काही वस्तू बनतील त्या वस्तूंचा जर भोग लावला, नेवेद्य जर अर्पण केला, तर खूप अति उत्तम राहील. कुलदैवता सततच, अगदीच स्थायी रूपात तुमच्या घरात वास करीत राहील.

तिचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. त्यातल्या त्यात चार गोष्टीचा, त्यात पहिला जो आपल्या घरातील पहिली जी भाकरी बनेल ती गोमाते साठी काढून ठेवा, दुसरी भाकरी कुत्र्यासाठी काढून ठेवा, तिसरी भाकरी कावळ्या साठी. भाकरी म्हणजे काय अगदी तुकडा जरी आपण केला, किंवा छोट्या छोट्या भाकरी जरी केल्या. नैवेद्य ज्या प्रकारे करतो अगदी तसा. तर अगदी छोटीशी भाकरी किंवा चपाती.

तर कावळ्यासाठी, अणि त्यानंतर आपल्या देवी देवतांसाठी तो नेवेद्य, प्रसाद आपण तयार करून ठेवायचा आहे. सर्वात आधी देवाला आपण नेवेद्य दाखवणार आहोत. आणि त्यानंतर आपण आपल्या घरातील लोकांनी हे भोजन, हे अन्न, ग्रहण करायचे आहे. हा एक नियम जर आपण पाळला, तर आपली कुलदेवता आपल्यावर नक्की प्रसन्न होईल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!