मांस मटण खाणाऱ्यांची सेवा स्वामी स्वीकारतात का? कारण जाणून चकित व्हाल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात श्री स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते.

यातून महाराजांचे चरित्र, त्यांचे संदेश, त्यांची शिकवण, त्यांच्या लीला यांचे श्रवण, कीर्तन, वाचन केले जात असते. मात्र, या सगळया मध्ये आपल्याला एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे, मांस मटण खाणाऱ्यांची  सेवा स्वामी स्वीकारतात का?. मग चला तर जाणून घेऊया याचे उत्तर…

आपल्यापैकी जवळपास 60 ते 70% लोक मांसाहार सेवन करतात. मात्र, आपल्यापैकी अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की, मांसाहार करणारे लोकांची पूजा स्वामी स्वीकारतात का?

तर यावर आपले ग्रंथ स्कंदपुराण आणि श्री भगवत गीतेमध्ये दिलेलं आहे. तर हिंदू धर्मातील स्कंद पुराणातील काशी खंडात तिसऱ्या अध्यायामध्ये मांसाहारी करणाऱ्या व्यक्तींचा धिक्कार देखील केलेला आहे.

त्यानुसार मांसाहार करणारे लोकांना मृत्युलोकात कोणते सुख मिळत नाही. तसेच सोबतच स्कंदपुराणात एका प्रसंगाचे वर्णन केलेले आहे.

त्यामध्ये असे सांगितले आहे की, ज्यावेळी देवी- देवतानी काशीमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी बघितले की, वाघ आणि बाकी मांसाहारी प्राण्यांनी गवत चारा खात आहेत. तसेच सोबत त्यामध्ये असे देखील सांगितलेलं आहे की, जरी भुकेमुळे एखाद्या मनुष्य प्राण्यांचा मृत्यू होत असेल, तरी त्याने सुद्धा कधी मांस खाऊ नये.

इतकेच नाही तर जे व्यक्ती दारू आणि मांसाहार सेवन करतात, त्यांचे पूजन भगवंत कधीच स्विकारत नाहीत. स्कंदपुराणानंतर वरर्ह पुराणात देखील या गोष्टीचे वर्णन केलेले आहे.

भगवान श्रीहरी विष्णूचा अवतारमध्ये पृथ्वी मातेने त्यांना यावर प्रश्न केला होता, त्यावेळी ते म्हणतात की, जे लोक मांसाहार करतात मी त्यांच्या पूजनाचा कधीच स्वीकार करत नाही.

तसेच मी अशा लोकांना माझे फक्त देखील मानत नाही. याशिवाय, भगवत गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण सांगितले आहे की, आनंदी जीवनासाठी मनुष्याने काय खावे आणि काय खाऊ नये.

तसेच श्रीकृष्ण सांगतात की, मांसाहार हे तामसिक भोजन नाही, त्यामुळे मनुष्याची बुद्धी कमकुवत होऊ लागते. तसेच मनुष्याचे त्याच्या इंद्रियावरचे नियंत्रण राहत नाही. त्यानंतर त्याची इच्छा नसतानाही तो अनेक वाईट कृत्य करू लागतो आणि पापाचा वाटेकरी बनू लागतो.

अशा लोकांनी माझे पूजनात व नामस्मरण केले तरी मी त्यांच्या मदतीला धावून जात नाही. भगवान कृष्ण असे देखील म्हणतात की, मांसाहारी भोजन हे राक्षससाठी आहे. मनुष्यासाठी योग्यच नाही.

भगवद्गीतेत श्रीकृष्णाने तीन वर्ग पाडलेले आहेत, ज्यामध्ये सात्विक आहार, राजश्रीक आहार आणि तामसिक आहार असे प्रकार आहेत.
त्यानुसार सात्विक अन्न आयुष्य वाढवणारे,

बुद्धी वाढवणे आणि आरोग्यसाठी असते. अर्थवेदांमध्ये सुद्धा म्हटले आहे की, मनुष्याने तांदूळ, डाळी आणि फळे इत्यादी वस्तूंचा खाद्यप्रकार म्हणून वापर करावा. हाच आहार मनुष्यासाठी योग्य आहेत.

मनुष्याने नर किंवा मादीची हिंसा करू नये. ज्या व्यक्तीने नर किंवा मादी अथवा अंड्यांना कच्चे किंवा शिजवून खातात त्याचा आपण विरोध व्हावा. तसेच ऋग्वेदामध्ये म्हटले आहे की, गाई ही आपल्या सर्वांची माय आहे, तिचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.

मनुष्य आणि स्वतः प्रमाणे प्राण्यांचे रक्षण करायला हवे. पुराणानुसार नियम शुद्ध सत्वित्क अन्न खावे म्हणजे मृत्यूनंतरही आपल्याला भगवंताची साथ प्राप्त होते. स्वामींना मांसाहारी व्यक्ती सेवेकरी कधीच मान्य नव्हते आणि नसतात देखील.

याच कारण म्हणजे जे सात्विक आहार घेत नाही, अशुद्ध आहार ज्याला म्हणलं जातं तो म्हणजे मांसाहार त्याने आपल्याला अनेक व्याधी जडतात तसेच अकाल मृत्यु, हृदयरोग होतो.

तसेच यामुळे मनाला आणि बुद्धीला कू प्रवृत्ती निर्माण होते. यामुळे अनेकवेळा माणूस संयम हरवून बसतो.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *