एक मूठ साखरेचा उपाय…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, भारत हा देश संस्कृती, परंपरा, प्राचीनता, विविधता, एकता, अद्भूतता, रहस्य, गूढ अशा अनेकविध गोष्टींसाठी ओळखला जातो. तसा तो मसाल्यांचा देश म्हणूनही ओळखला जातो. देशभरात विविध पद्धतीचे उच्च मूल्य असलेले मसाल्याचे पदार्थ अगदी प्राचीन काळापासून घेतले जातात.

मसाल्यांच्या पदार्थांचा मोठा उत्पादक आणि निर्यातक म्हणून भारताची वेगळी ओळख आहे. या मसाल्यांच्या पदार्थात विविध गोष्टींचा समावेश होतो. एकंदर सर्व पदार्थांचे एकत्रिकरण करून केलेल्या खाद्यपदार्थाला चिमूटभर मीठ घातल्याशिवाय पूर्ण होत नाहीत.

आपल्या आयुष्यात मीठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मीठाशिवाय जेवणाची आपण कल्पनाही करू शकत नाही. सोबत मानवी शरिराला ते आवश्यकही आहे. ज्योतिषशास्त्रातही मिठाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

आर्थिक आघाडीवरील समस्या वारंवार येत असेल, तर मिठाचे काही उपाय अत्यंत उपयुक्त करू शकतात. याशिवाय मिठामध्ये आकर्षून घेण्याची सर्वाधिक क्षमता असल्याने काही उपायांनी घरात सकारात्मक ऊर्जेचा अगदी मोठ्या प्रमाणात संचार होऊ शकतो.

इतकेच नाही, तर पापकारक मानल्या गेलेल्या राहु आणि केतुचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठीही मीठ उपयुक्त ठरते. याशिवाय सुख, शांतता, समृद्धी टिकावी, यासाठी मिठाचे उपाय उपयुक्त ठरतात, असे सांगितले जाते.

सैंधव मीठ किंवा खड्या मिठाचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. मिठाचे काही खडे लाल रंगाच्या कापडात बांधून घराच्या किंवा कार्यालयाच्या मुख्य दारावर टांगा. यामुळे घरात किंवा कार्यालयात नकारात्मक उर्जेचा शिरकाव होत नाही.

मीठ नकारात्मक उर्जा शोषून घेते. यामुळे घरात किंवा कार्यालयात सकारात्मक उर्जेचा संचार कायम राहतो, असे सांगितले जाते. मीठ कधीही कुठल्या धातूच्या भांड्यात ठेवू नये. मीठ काचेच्याच भांड्यात ठेवावे.

शक्य असल्यास मिठामध्ये तीन किंवा लवंगा टाकून ठेवाव्यात. यामुळे घरामध्ये सुख, शांतता अबाधित राहाते आणि धनाची कमतरता भासत नाही, असे सांगितले जाते.

रात्री झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने हातपाय धुतल्यास झोप चांगली लागते. राहु आणि केतु या पापकारक ग्रहांचा प्रभाव कमी करण्यासही मिठाचा उपयोग होतो.

आठवड्यातून एकदा लहान मुलांना मिठाच्या पाण्याची आंघोळ घालावी, यामुळे त्यांना दृष्ट लागत नाही, असे सांगितले जाते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास मीठ हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

ताणतणाव हल्ली फार सर्वसामान्य आजार झाला आहे. अगदी क्षुल्लक कारणांवरूनही अनेकदा चिडचिड, अस्वस्थता, डिप्रेशन, भूक न लागणे असे आजार डोके वर काढतात.

अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सैंधव मिठाचे सेवन शरीर आणि मनाला स्वस्थता देते. शांत होण्यास मदत करते. ज्योतिषशास्त्रानुसार राहु आणि केतु हे दोन छाया ग्रह आहेत. राहु आणि केतुची वक्रदृष्टी पडल्यास मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते.

राहु-केतुचा वाईट प्रभाव पडतो आणि संकटे ओढावतात, असे म्हटले जाते. मीठ आणि काच या दोन्ही गोष्टी राहुशी निगडीत आहेत. काचेच्या बाऊलमध्ये मीठ भरून ते बाधरूममध्ये ठेवल्यास घरात सकारात्मक उर्जेचा संचार राहतो.

हे मीठ दर काही दिवसांनी बदलत राहणे गरजेचे आहे, असे सांगितले जाते. घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील, तर अशा वेळी मिठाचे काही उपाय अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, असे सांगितले जाते.

कुटुंबातील सदस्यांमध्ये सतत मतभेद, भांडणे, वादविवाद होत असल्यास मिठाच्या पाण्याने संपूर्ण घर पुसून काढावे. वास्तुशास्त्रानुसार, असे केल्याने घरातील सकारात्मक उर्जा वाढायला मदत होते.

कुटुंबामध्ये प्रेम वाढीस लागते आणि कलह कमी होतात, असे सांगितले जाते. तसेच साध्या पाण्यात घालून सैंधव मिठाचे सेवन करता येते. अस्वस्थता आणि ताणतणाव कमी व्हायला मदत होऊ शकते.

गरम पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्यासही ताण कमी होतो, असे सांगितले जाते. अनेकदा प्रलंबित येणी वेळीच प्राप्त होत नाहीत. मग आर्थिक आघाडीवरील चिंता वाढते. घरात पैशांची कमतरता भासू नये, यासाठी मिठाचे काही विशेष उपाय सांगितले जातात.

काचेच्या ग्लासात मिठाचे पाणी भरून ते घराच्या उत्तर पूर्वेला ठेवून द्यावे. त्यापाठी लाल रंगाचा बल्ब लावावा. विद्युत योजना करणे शक्य नसल्यास लाल रंगाचा ग्लास घ्यावा. पाणी संपल्यास ते पुन्हा भरून ठेवावे.

यामुळे घरात आर्थिक सुबत्ता नांदण्यास मदत होते आणि अडकलेले पैसे, प्रलंबित येणी परत मिळण्यासही मदत होते, असे सांगितले जाते. अनेकदा वैवाहिक जीवनात काही ना काही तणाव, कुरबुरी सुरू असतात.

जोडीदाराच्या नात्यातील ताण वाढत जातो. मात्र, जोडीदारांमध्ये वारंवार भांडण, तंटे होत असल्यास मिठाचा उपाय उपयुक्त मानला जातो. वैवाहिक जीवनात वारंवार भांडणे होत असतील, तर मिठाचा तुकडा किंवा सैंधव मीठ हे बेडरूममध्ये ठेवून द्यावे.

हे तुकडे किंवा मीठ दर महिन्याला बदलावे. यामुळे जोडीदारांमधील प्रेम वाढीला लागते आणि नाते मजबूत होण्यास मदत होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

एक मूठ साखर तुम्ही मुंग्यान खाऊ घाला गरीबला दान द्या त्यामुळे तुम्हाला जाणवेल की घरातील अडचणी संपत आहेत.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *